Rajya Sabha Election । आगामी राज्यसभा निवडणुकीत एक रंजक लढत पाहायला मिळ्ण्याची शक्यता आहे. भाजपने (भाजप) अनेक राज्यांत एकापेक्षा जास्त उमेदवार मैदानात आणून विरोधकांची गोची केलीय आहे. त्यामुळे यंदाची राज्यसभा निवडणूक विरोधकांसाठी अवघड बनवली आहे. यावेळी भाजपने उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेशमधून राज्यसभेसाठी एक-एक जास्त उमेदवार उभे केलेत.
भारतीय जनता पक्षाच्या या रणनीतीमुळे विरोधक चांगलेच हादरले आहेत. अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे राज्यांमधील स्पर्धा अधिक रंजक बनलीय. भाजपच्या या खेळीमुळे उत्तरप्रदेशमध्ये सपाची एक जागा आणि हिमाचलमध्ये काँग्रेसचे अभिषेक मनू सिंघवी यांची जागा धोक्यात येणायची शक्यता आहे.
विरोधात क्रॉस व्होटिंग होण्याची भीती Rajya Sabha Election ।
हिमाचल प्रदेशात काँग्रेसच संख्याबळ पूर्ण आहे. 68 सदस्यीय विधानसभेत काँग्रेसचे 40 तर भाजपचे 25 आमदार आहेत. काँग्रेसला याठिकाणी विजयासाठी 34 आमदारांची गरज आहे, परंतु पक्षातील अंतर्गत कलहामुळे याठिकाणी क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता जास्त आहे.
कर्नाटक आणि महाराष्ट्रातही क्रॉस व्होटिंगचा धोका Rajya Sabha Election ।
हिमाचलसोबतच कर्नाटक आणि महाराष्ट्रातही काँग्रेसला क्रॉस व्होटिंगची भीती आहे. कर्नाटकात विधानसभेच्या 4 जागांवर मतदान होणार आहे. याठिकाणी काँग्रेस तीन जागा जिंकेल आणि भाजप-जेडीएस युती एक जागा जिंकेल हे निश्चित मानले जात आहे.
काँग्रेसने कर्नाटकमधून अजय माकन, अनिल कुमार यादव आणि नासिर हुसेन यांना उमेदवारी दिली आहे. त्याच वेळी, जेडीएसने माजी राज्यसभा सदस्य डी कुपेंद्र रेड्डी यांना रिंगणात उतरवलयं, तर भाजपने पाचवे उमेदवार म्हणून नारायणसा बांगडे यांना उभे केले आहे, त्यामुळे काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा असल्याचे दिसतंय.
दुसरीकडे महाराष्ट्रातही काँग्रेसची असणारी एकमेव जागा गमावण्याची भीती आहे. पक्षात क्रॉस व्होटिंग झाले तर त्यांचे एकमेव उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव होण्याची भीती पक्षाला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये रंजक स्पर्धा
उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या 10 जागा आहेत. त्यावर भाजपला 7 तर सपाला तीन जागा मिळत असल्याचे चित्र समोर आलंय. मात्र तिसऱ्या उमेदवाराबाबत समाजवादी पक्षात बंडखोरी सुरू झालीय. या संधीचा फायदा घेण्यासाठी भाजपने संजय सेठ यांना याठिकाणावरून आठवे उमेदवार म्हणून उभे केले आहे. ज्यासाठी उत्तर प्रदेशात राज्यसभेची निवडणूक जास्तच रंजक बनलीय.