कोल्हापूर (प्रतिनिधी) – लॉकडाऊन काळातील तीन महिन्याचे संपूर्ण वीज बिल माफ करा या मागणीसाठी आज (दि. १०) कोल्हापूरात सर्वपक्षीय राज्यस्तरीय आंदोलनाला सुरुवात झाली आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे सह सर्व लपक्षीय आंदोलक मोठ्या संख्यने सहभागी झाले आहेत.
लॉकडाउन मधील घरगुती बिले तात्काळ रद्द करा अशी मागणी या वेळी सर्वपक्षीय आंदोलकांनी केली. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना कोल्हापूर जिल्हा व शहर सर्वपक्षीय कृती समितीचा सहभाग उस्फुर्त सहभाग नोंदवला आहे.
दरम्यान, सरकार ने लॉकडाउन काळातील विज बिल संपूर्ण रद्द केली नाही तर मात्र सरकारला शॉक द्यावा लागेल असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला आहे. तर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील वीजबिलासाठी फक्त साडेचार हजार कोटींची तरतूद करायला हवी अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रताप होगाडे यांनी दिलाय. ते कोल्हापूरात बोलत होते.