नवी दिल्ली – बाहुबली आणि RRR सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे लेखक एस एस राजामौली यांचे वडील विजयेंद्र म्हणाले,’ जर RSS नसता तर….काश्मीर झाला नसता…पाकिस्तान विलीन झाला असता…आणि मग लाखो हिंदू मारले गेले असते…’ त्यांचे हे विधान सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.
नुकतेच विजयेंद्र प्रसाद यांनी विजयवाडा येथे आयोजित आरएसएसचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य राम माधव यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला हजेरी लावली होती. कार्यक्रमादरम्यान विजयेंद्र प्रसाद यांनी आरएसएसवर एक चित्रपट आणि वेब सिरीज लिहिण्याची घोषणा केली. यावेळी ते म्हणाले, “मला तुम्हा सर्वांसमोर काहीतरी कबूल करायचे आहे. तीन-चार वर्षांपूर्वीपर्यंत मला RSS बद्दल फारशी माहिती नव्हती. मला वाटायचे RSS ने गांधींना मारले. पण जेव्हा मला RSS वर चित्रपट लिहायला सांगितला गेला तेव्हा मी नागपूरला गेलो. मोहन भागवत यांची भेट घेतली. मी एक दिवस तिथे राहिलो आणि पहिल्यांदाच RSS म्हणजे काय हे समजले.’
‘मला खूप वाईट वाटले की इतक्या मोठ्या संघटनेबद्दल मला इतके दिवस माहित नव्हते.” ते पुढे म्हणाले, “जर RSS नसता, तर काश्मीर नसता, ते पाकिस्तानमध्ये विलीन झाले असते. आणि पाकिस्तानमुळे लाखो हिंदू मारले गेले असते.”
विजयेंद्र प्रसाद पुढे म्हणाले, “मला तुम्हा सर्वांना एक आनंदाची बातमी द्यायची आहे, मी लवकरच काम सुरू करणार आहे. मी आरएसएसवर एक चित्रपट आणि वेब सिरीज बनवत आहे. मी वचन देतो की आपण सर्वांनी आरएसएसच्या महानतेचा अभिमान बाळगावा याची मी खात्री करेन.”
अभिनेत्री कंगना राणावतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर विजयेंद्र यांचे काश्मीरवरील वक्तव्य शेअर केले आहे. विजयेंद्र प्रसाद यांच्या कोटचे इंग्रजीत भाषांतर करण्यासाठी अभिनेत्रीने सोशल मीडियावर लिहिले, “जर आरएसएस नसते, तर काश्मीर नसते, ते पाकिस्तानमध्ये विलीन झाले असते. मला खूप खेद वाटतो की मला इतक्या मोठ्या संस्थेबद्दल इतके दिवस माहित नव्हते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक चूक केली आहे, की स्वतःबद्दल जनतेला सांगण्याची नाही. ही पोकळी मी जमेल तितकी भरून काढेन.”