मुंबई – रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळून निर्माण झालेल्या आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात अतिवृष्टी व दरड कोसळलेल्या भागात सैन्यदलांची मदत उपलब्ध करण्यात आली आहे. अडचणीत सापडलेल्या लोकांच्या मदतासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही सरसावली आहे.
राज्यातील आपात्कालिन परिस्थित जमेल ती मदत करण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आवाहन केले आहे.
महाराष्ट्रात सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातला आहे. सध्याच्या स्थितीत लोकांचा जीव महत्त्वाचा आहे यामुळे सर्व मनसैनिकांनी तात्काळ मदत करावी. या व्यतिरिक्त पूरपरिस्थिती ओसरल्यावर रोगराईचा धोका वाढण्याची शक्यता आहे. यामुळे तातडीची मदत पोहचविण्याची व्यवस्था करण्याचे आवाहनही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
महाराष्ट्र सैनिकांना आवाहन… pic.twitter.com/JiT5I13l4Q
— Raj Thackeray (@RajThackeray) July 23, 2021
महाराष्ट्रावर हे मोठ संकट आहे. त्याला तोंड देताना आपल्याकडून कुठलीही कुचराई होता काम नये, असंही राज यांनी म्हटलं आहे.