Raj Thackeray । महायुतीच्या लोकसभा जागा वाटपाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी होण्याच्या दृष्टीने मोठी पावलं उचलत असल्याचे दिसत आहे.
आज सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी राज ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळी मनसेकडून दक्षिण मुंबई, नाशिक किंवा शिर्डी या तीन पैकी किमान दोन लोकसभा मतदारसंघांची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, या भेटीवरून चर्चा अशीही आहे की, दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिमाध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले संदीप देशपांडे…
‘राज ठाकरे दिल्लीला का गेलेत? हे लवकरच स्पष्ट होईल. राज ठाकरे जो निर्णय घेतील तो हिंदुत्वाचा, महाराष्ट्राचा, पक्षाच्या हिताचा असेल. बाळा नांदगावकर आमचे ज्येष्ठ नेते आहेत, ते दिल्लीत गेले तर आम्हाला आनंद होईल.’असेही ते म्हणाले आहे.
ते पुढे म्हणाले की, ‘साहेब आम्हाला जेआदेश देतील त्यानुसार आम्ही काम करू, कधी यश आलं, अपयश आलं, पण खचून गेलो नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणात चिखल झालाय हे खरं आहे. राज ठाकरे हित बघून निर्णय घेतील. महायुतीमध्ये जाणार वगैरे अशा बातम्या तुम्ही चालवताय. आम्हाला कोणतीही अट घातलेली नाही’
हे वाचाल का ? राज ठाकरे महायुतीत जाणार ? रोहित पवार म्हणाले,’धाडसीपणाने लढणाऱ्या नेत्यांनी घाबरून…’