मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १७ वा वर्धापन दिन काल जल्लोषात पार पडला.वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे ठाण्यातील गडकरी रंगायथन येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गेल्या काही महिन्यातील राजकीय वातावरण पाहता राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत.कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राज ठाकरेंनी चांगलीच टोलेबाजी केली.
देशातील आणि राज्यातील राजकीय वादावर बोलताना त्यांनी भाजपसह टीका केलीच शिवाय उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधला. मनसेने आतापर्यंत काय काय केलं आहे याची माहिती यावेळी ठाकरेंनी दिली. भोंग्याच्या प्रकरणात महाराष्ट्रभर सतरा हजार केसेस दाखल झाल्या. मी म्हणालो ना, वाट्याला जायचं नाही. मुख्यमंत्रीपदावरून जावं लागलं” असा टोला राज ठाकरेंनी यावेळी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला.
यादरम्यान राज ठाकरे यांनी मनसेची अधिकृत वेबसाईट देखील लॉंच केली. इंदू मिलमध्ये इतकं मोठं ग्रंथालय उभं राहिलं पाहिजे की संपूर्ण जग तिथे ज्ञान मिळवायला बाबासाहेबांच्या चरणी आलं पाहिजे. पुतळे उभे करून हाती काही लागत नाही असंही ठाकरे यावेळी म्हणाले. मनसेने आतापर्यंत केलेली आनॊदलाने आणि इतर संघर्ष याबाबतची सर्व माहिती यावेळी मनसे कार्यकर्त्यांना देण्यात आली.
जनता सध्याच्या राजकीय तमाशांना विटलेली आहे. आपण फक्त त्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. जेव्हा केव्हा महानगर पालिका निवडणुका लागतील, तेव्हा मनसे सत्तेत असणार असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला. तसेच आता जास्त काही न बोलता २२ मार्चच्या गुडी पाडवा मेळाव्यात बोलणार असल्याची आठवण देखील यावेळी राज ठाकरेंनी करून दिली.