विशाखापट्टनम – आंध्र प्रदेशमध्ये सतत पावसाचा कहर सुरूच आहे. राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे एक घर कोसळले असून या अपघातात चार मुलांसह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
#WATCH | Today, Indian Air Force’s Mi-17 helicopter evacuated ten people stuck in the rising waters of Chitravati river in Ananthapur district, Andhra Pradesh, in difficult weather conditions.
(Video: IAF) pic.twitter.com/jT4qMBgxFl
— ANI (@ANI) November 19, 2021
यातच शुक्रवारी समोर आलेल्या माहितीनुसार, अनंतपूर जिल्ह्यातील चित्रावती नदीची पाणीपातळी प्रचंड वाढली. यात नदीमध्ये दहा लोक अडकले. हे लोक मदतीची मागणी करत होते. अशात भारतीय वायुसेनेच्या एमआय १७ विमानाच्या मदतीनं या सर्वांना बाहेर काढण्यात आलं
सध्या या घटनेचा व्हिडियो सोशलवर चांगलाच व्हायरल झाला आहे. मिळलेल्या माहितीनुसार, अनंतपूर येथील चितत्रावाती नदीची पाणीपातळी अचानक वाढली. यावेळी तेथील परिसरात उभी असलेली कार पावसाच्या पाण्यात वाहून गेली. आणि कार मध्ये बसलेले लोक पुराच्या पाण्यात अडकले. यादरम्यान लोक मदतीसाठी मागणी करू लागले. त्यांना वाचवण्यासाठी सहा स्थानिक लोक जेसीबी घेऊन पोहोचले. मात्र पुराच्या पाण्यात जेसीबीही अडकला. अशात हे दहा लोक मदतीसाठी ओरडू लागले. यादरम्यान वेळेत एमआय १७ विमानाच्या मदतीनं या सर्वांना बाहेर काढण्यात आलं