नवी दिल्ली : देशाच्या अर्थसंकल्पानंतर इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. इंधन दरवाढी बरोबरच सिलेंडरच्या किंमतीही बऱ्यापैकी वाढल्या आहेत. याच वाढलेल्या किंमतीवरून विरोधी पक्षाकडून सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे. यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीदेखील सरकारवर सडकून टीका केली आहे.
देशात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा परिणाम म्हणून इतर गोष्टींचे दरही वाढत आहेत. गुरुवार आणि शुक्रवार सरकारने सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ केली आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या किंमतींवरून विरोधी पक्ष मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही शनिवारी ट्वीट करत सरकारवर हल्ला केला.
मोदी सरकार ने बजट बिगाड़ दिया-
देश और घर, दोनों का! pic.twitter.com/6GPrNwFuPm— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 6, 2021
राहुल गांधी यांनी एका ट्वीटद्वारे केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकारने देश आणि घराचे बजेट खराब केले आहे.