Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra| काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात दाखल होणार आहे. आज नंदूरबार येथून भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. यानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये येणार असल्याने यामुळे ही यात्रा महत्त्वपूर्ण मानली जात आहे. यानिमित्त अनेक काँग्रेस कार्यकर्ते एकत्र येणार आहेत.
नंदुरबार जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे. त्यामुळे ही यात्रा नंदूरबारमध्ये पहिल्यांदा दाखल होणार आहे. अगदी नेहरूंपासून गांधी घराण्यातील सगळ्याच व्यक्तींचा नंदुरबार जिल्ह्याशी जिव्हाळ्याचा संबंध राहिला आहे. मात्र मागील काही वर्षांमध्ये येथे गांधी घराण्यातील कोणतीही व्यक्ती आली नव्हती. अखेर आज राहुल गांधी येथे येणार आहेत. यावेळी ते आदिवासी बांधवांसोबत संवाद साधणार आहेत.
राहुल गांधी यांचा नंदुरबार जिल्हा दौरा कार्यक्रम कसा असणार ? Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra|
आज 12 मार्च रोजी त्यांचे 1:10 वाजता सुरत विमानतळावर आगमन होणार आहे. 1:10 ते 2:00 दरम्यान ते सुरत नंदुरबार हेलिकॅप्टरने प्रवास करणार. 2 वाजता राहुल गांधी यांचे पोलीस मुख्यालय येथील हेलीपॅडवर आगमन होणार आहे. त्यानंतर 2 ते 3 वाजेदरम्यान धुळे चौफुली ते सभा स्थान असा त्यांचा रोड शो असणार आहे. 3 वाजता ध्वज हस्तांतरण कार्यक्रम, सांस्कृतीक कार्यक्रम आणि 4:45 राहुल गांधी जनसमूदयाला मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर साधारण 4:30 वाजता ते दोंडाईचाकडे प्रयाण करतील.
महाराष्ट्रात भारत जोडो न्याय यात्रा 12 ते 17 मार्च दरम्यान असणार आहे. भारत जोडो न्याय यात्रा 13 मार्च रोजी धुळ्यात, 14 मार्च रोजी नाशिक 15 मार्च रोजी पालघर, ठाणे तर 16 मार्चला मुंबईत दाखल होणार आहे. त्यानंतर 17 मार्च रोजी शिवाजी पार्क मैदानावर भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होणार आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप 17 मार्च रोजी शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना भारत जोडो यात्रेला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. तर राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला 14 मार्च रोजी शरद पवार उपस्थित राहणार आहेत. या सभेला इंडिया आघाडीतील सर्व घटकपक्षांचे प्रमुख उपस्थित राहण्याची शक्यता आहे. भारत यात्रेदरम्यान मोठे शक्तीप्रदर्शन लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीकडून यावेळी केले जाण्याची शक्यता आहे. Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra|
हेही वाचा:
वसंत मोरे यांच्या भावनिक पोस्टमुळे चर्चांना उधाण,’ना कोणाकडे तक्रार करतो ना…’