Rahul Gandhi – भारताचे जे आधारकार्ड आहे. ज्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला ओळख मिळते, ते येथे का नाही लागू केले? आदिवासी जिल्ह्यात का लागू केले नाही? कारण आम्ही मेसेज देऊ इच्छितो की, तुम्ही देशाचे खरे मालक आहात. जल, जंगल आणि जमीन तुमची होती. परंतु तुमच्याकडून ते घेतले गेले. खरं तर जल, जमीन आणि जंगलवर तुमचा हक्क आहे, असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले.
भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी महाराष्ट्रात दाखल झाली. त्यानंतर आदिवासी बहुल नंदूरबार जिल्ह्यातील टेंभली येथे राहुल गांधी यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांचे स्थानिक आदिवासींनी स्वागत केले. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
राहुल गांधी म्हणाले, भाजपवाले तुम्हाला वनवासी म्हणतात, पण आम्ही तुम्हाला आदिवासी म्हणतो.
देशाची पहिली ओळख असलेल्या आधारकार्ड सर्वात आधी आम्ही या नंदुरबारमध्येच का लागू केला. कारण आम्हाला संदेश द्यायचा होता की, आदिवासी हेच मुळ मालक आहेत. एकीकडे मोदी सरकारने या देशातील उद्योगपतींचे १६ लाख कोटी कर्ज माफ केले, पण आदिवासींना एक रुपयांचाही दिलासा दिला नाही, हे सरकार केवळ उद्योगपतींचा विचार करते.
येथील जमीन, पाणी, जंगलावर तुमचा हक्क आहे. बीजेपी तुम्हाला वनवासी म्हणते आणि जंगल संपवण्याचे काम करते. जंगल, जमीन हे सर्व अदानींसारख्या करोडपतींना दिली जाईल आणि मग बीजेपी तुम्हाला म्हणेल की, तुम्ही वनवासी आहात, जंगल तर राहिलेच नाही. तुम्हाला रस्त्यावर आणण्याचे काम हे मोदी सरकार करत आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.
महाविद्यालयीन युवा, महिलांचा विचार कधी झाला नाही. एक रुपयांची मदत देखील झाली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे १६ लाख कोटी रुपये ही रक्कम किती मोठी आहे हे देखील तुम्ही लक्षात घ्या. २४ वर्षांला जेवढा मनरेगाला पैसा लागणार होता, तेवढा पैसा या २० ते २५ करोडपती लोकांचा पैसा माफ झाला आहे.
यात अदानी, अंबानी यासारख्या लोकांचा समावेश आहे. उद्योगपतींसाठी हे सरकार सगळ करत आहे. पण आदिवासी, गरीबांसाठी काहीही करत नाही, असे म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.
मिडीयात अदिवासिंचा समावेश नाही । Rahul Gandhi
मोदी मीडिया, अदानी मीडिया यात कोणत्याही आदिवासींचा समावेश होत नाही. मुळात या ठिकाणी असलेल्या पत्रकारांची चूक नाही. कारण हे पगारामुळे बांधिल आहे. मोठ मोठ्या अॅंकर व रिपोर्टरची लिस्ट जर तुम्ही काढल्यास टीव्हीवर कधी आदिवासी रिपोर्टर पाहिला का, मीडियामध्ये तुमची शून्य टक्के भागीदारी आहे. जमीन, जल, जंगलाचा मुद्दा मीडियामध्ये दिसणार नाही. सोशल मीडियावर हे प्रश्न येतील. पण माध्यमांवर येऊ शकत नाही, कारण हा मीडिया देखील बांधिल आहे, असेही राहुल म्हणाले.
जातनिहाय जनगणना, आर्थिक सर्वेक्षण करणार । Rahul Gandhi
पब्लिक स्कूल, प्रायव्हेट स्कूल, हॉस्पिटल यांची लिस्ट काढल्यास त्यात कुठेही आदिवासी दिसत नाही. हे सर्व आम्हाला बदलायचे आहे. आदिवासी ८, दलित १५ तर मागासवर्गीय ५० टक्के आहे. पण या सर्वांवर अन्याय होत आहे. त्यामुळे सर्व देशात जातनिहाय जनगणना करण्याची गरज आहे.
जनगणना करण्याबरोबरच आर्थिक सर्वेक्षण करण्यात येईल. जर 8 टक्के आदिवासींचा सहभाग नसेल तर ती झाली पाहिजे. त्यामुळे जनगणना व आर्थिक सर्वेक्षण हे आमचा अजेंडा आहे. आमचे सरकार आल्यावर आम्ही ते करून दाखवणार, असेही ते म्हणाले. । Rahul Gandhi