- वाहने विनाटोल सोडल्याने “ट्राफिक जाम’ आटोक्यात
खालापूर – दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पुण्याला निघालेल्या मुंबईकरांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे मुंबई-पुणे “एक्स्प्रेस वे’वर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. वाहनांच्या रांगा पाहता “ट्राफिक जाम’ सोडवण्यासाठी अखेर काही वाहने टोल न घेता सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
लक्ष्मीपूजन झाल्यानंतर रविवारला जोडून भाऊबीज-पाडव्याची सुट्टी आहे. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या मुंबईकरांची संख्या वाढली आहे. मुंबई आणि ठाणेकर मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे रविवारी सकाळच्या सुमारास दीड ते दोन किमी लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अखेर विनाटोल वाहने सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
खालापूर टोलनाक्यावरुन पुण्याकडे जाणारी वाहने टोल न घेता सोडल्या गेल्या. त्यानंतर मुंबई-पुणे महामार्गावरील वाहन कोंडी काहीशी आटोक्यात आली.