फुरसुंगी – नवा मुळामुठा कालव्यातून महापालिका भेकराई नगर, संपूर्ण गंगानगर, ढमाळवाडी तुकाई दर्शन परिसराला पाणी पुरवठा करते. परंतु, कालव्याची स्वच्छता केलेली नसतानाच यामध्ये पाणी सोडण्यात आल्याने त्यातून या परिसराला दुगर्धीयक्त पाणी पुरवठा करण्यात येत होता. यामुळे नागरिकांसह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत प्रशासनाला धारेवर धरले होते. अखेर, महापालिका आणि पाटबंधारे विभागने याची दखल घेत या भागातील कालव्याची स्वच्छता करून कालव्याला पाणी सोडले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महापालिका या कालव्यातून पाणी उलचून ते या भागाला पुरवते. परंतु, पावसाळ्यानंतर या कालव्याची स्वच्छता करण्यात आली नव्हती. त्यामुळे कालव्यात कचरा साचला होता, त्यातच मैला मिश्रीत पाणीही सोडले जोत होते. याशिवाय 15 ते 20 डुक्कर मृतावस्थेत पडलेली होती. याबाबत पालिकेला व पाणी पुरवठा अधिकारी कर्मचाऱ्यांना महिती कळविण्यात आल्यानंतरही कालव्यात पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे जनावरं तशीच पाण्यात फुगुन पडून होती. परीसरात दुर्गंधी सुटली होती. यातून दुर्गंधीयुक्त पाणी विहिरीत घेउन पडत होते. 30-40 टक्के प्रक्रिया करून दूषित पाणी पुरवठा केला जात होता. 8 ते 10 दिवस पाणी येत नसल्याने नाईलाजास्तव नागरीक अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त पाणी वापरात होते. यातून त्यामुळे नागरीकांना आरोग्याच्या समस्या तसेच आजारपण, त्वचेचे आजार जडले, अनेकांना पोटाचा त्रास होऊ लागला. अखेर, पालिकेने कालव्यांची स्वच्छता करावी, शुध्द पाणी पुरवठा करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवासेनेचे शादाब मुलाणी यांनी दिला होता. त्यानंतर भेकराईनगर चौकात तिव्र आंदोलनही करण्यात ओ. अखेर, महापालिकेने मृतावस्थेतील डुकरं बाहेर काढून कालवा स्वच्छ केला त्यानंतर आता यामध्ये पाणी सोडले आहे. जुन्या कालव्यातही पाणी सोडण्यात आले आहे.
महापालिकेला सूचना…
पुणे शहराची लोकसंख्या वाढल्याने पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागातील हवेली, दौंड व इंदापूर तालुक्यातील 66 हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीला पाणी पुरवठा करताना झूकते माप मिळत नाही. हे शेतकऱ्यांनीही पाण्याची आशा सोडली होती. परंतु, जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला नियमाच्या सूचना करीत पाणी सोडल्याने हवेली, दौंड व इंदापूर तालुक्यातील 66 हजार हेक्टर वरील शेतीला पाणी उपलब्ध होणार आहे.
अस्तरीकरणाचा फायदा झाला की तोटा ?
नवीन मुठा उजव्या कालव्याला आतल्या बाजूने अस्तरीकरण करण्याचे काम जोरदार सुरू आहे. या कामामुळे गेल्या दोन तीन महिन्यांत कालव्याला पाणी आलेले नाही. स्थानिक शेतकरी या अस्तरीकरणाच्या कामाला विरोध करीत आहेत; मात्र, सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष कुणीच या शेतकऱ्यांच्या मागे उभे राहून अस्तरीकरणाला विरोध करत नाही. संपूर्ण कालव्याचे अस्तरीकरण झाल्यावर कालव्यातून पाणी न पाझरल्यामुळे परिसरातील विहीरी, बोअर कोरड्या पडून शेतीच्या सोडा पिण्याच्या पाण्याचाही दुष्काळ पडणार आहे. त्यावेळी शेतकरी जागा होईल; मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल.