पुणे -करोनामुळे रखडलेले भीमा कोरेगाव चौकशी आयोगाचे कामकाज येत्या 2 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यामध्ये भीमा कोरेगावप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा जबाब नोंदविण्यात येणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसाचार घडला होता. त्याच्या चौकशीसाठी आयोग नेमण्यात आला आहे. या चौकशीचे कामकाज 2 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यामध्ये पवार यांचा जबाब नोंदविण्यात येणार आहे.
पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यात त्यांनी कोरेगाव भीमाबद्दल काही माहिती दिली होती. त्यानंतर पवार यांचा जबाब नोंदविण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती.