पुणे- समाविष्ट गावांतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या अर्जाची छाननी आणि चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून पुढील प्रक्रिया पार पडेल, असे विभगीय आयुक्तांकडून कळविण्यात आले आहे. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांचे भवितव्य या समितीच्या हातात आहे.
हवेली आणि मुळशी तालुक्यातील 23 गावे पुणे महापालिकेत समाविष्ट झाली आहेत. मात्र, ही गावे समाविष्ट होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती झाली आहे. त्यावरून अनेक तक्रारी, वाद झाले असून, पुणे महापालिकेकडून या गावातील भरती केलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी केले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी महापालिकेकडे सेवेतून कमी करु नये म्हणून विनंती अर्ज केले. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी या कर्मचाऱ्यांचे विनंती अर्ज विभागीय आयुक्तांकडे छाननी व चौकशीसाठी वर्ग केलेले आहेत.