इंदापूर -राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखालील युती सरकारने विधिमंडळात सादर केलेला अर्थसंकल्पामध्ये सर्व समाजाला व घटकांना न्याय देण्यात आला आहे. विधिमंडळाच्या इतिहासातील उत्कृष्ट असा अर्थसंकल्प आहे, असे गौरवोद्गार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे पत्रकार परिषदेत काढले.
पाटील म्हणाले, लाकडी-लिंबोडी योजनेसाठी 450 कोटींची तरतूद, इंदापूर तालुक्यातील रस्ते व पुलांच्या कामासाठी 55 कोटी रुपये रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तावशी पुलासाठी 17 कोटींचा निधी दिला. केंद्र सरकारच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील हरघर हरजल योजनेसाठी सुमारे 800 कोटी रुपयांचा निधी आला आहे.
यावेळी तानाजी थोरात, माऊली चवरे, माऊली वाघमोडे, कृष्णाजी यादव, विलास वाघमोडे, अशोक इजगुडे, पांडुरंग मारकड, शरद जामदार, गजानन वाकसे, आकाश कांबळे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.