बीसीसीआयने यंदापासून सुरु केलेल्या महिलांच्या आयपीएल स्पर्धेबाबत नुकतेच काही वक्तव्य करण्यात आली. येत्या काळात म्हणे ही महिला लीग जागतिक स्तरावरील महिला लीगमधील सर्वात श्रीमंत लीग होणार. श्रीमंती ही केवळ पैसा कीती मिळतो व बीसीसीआयला यातून कीती लाभ होतो या निकषावर होणार असेल तरक मग त्याचे रुप पुरुषांच्या आयपीएल स्पर्धेसारखेच उत्सवी ठरेल. श्रीमंती ही गुणवत्ता व कामगिरीच्या निकषावर होणे गरजेचे आहे.
आपल्या संघाकडे पाहीले तर सगळ्याच केळाडू चांगल्या आहेत. पण कपील देव म्हणतात तसे भारताचा चांगले खेळाडू नव्हे तर महान खेळाडू हवेत तरच वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियासारखे जागतिक क्रिकेटवर काही दशके राज्य गाजवता येइल. यंदाचा महिला आयपीएलचा हा पहिलाच मौसम आहे. पुढे खूप प्रवास करायचा आहे, त्यामुळे या क्रिकेटकडे गांभीर्याने पाहिले गेरे तरच त्याची प्रगती व प्रसार तळागाळापर्यंत होइल व त्यातून केवळ भारतीय संघालाच नव्हे तर स्पर्धेत सहभागी होत असलेल्या सर्व देशांच्या संघाला नवनवे खेळाडू इंडिया मटेरियल म्हणून मिळतील.
महिला आयपीएल स्पर्धेत विविध संघांतून केळत असलेल्या भारतीय संघाबाबत बोलायचे झाले तर कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रीक्स, पुनम यादव, राजेश्वरी गायकवाड अशा कितीतरी खेळाडू आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवताना दिसतात. पण पुढे काय हा जो प्रश्न आहे त्याचेच उत्तर आपल्याला या महिलांच्या आयपीएलमध्ये शोधायचे आहे.
या स्पर्धेतील सामने पाहिले तर गुणवत्ता दिसते पण त्याला अनुभवाची जोड मिळाली तरच या लीगमधून आपल्या मिताली राज, अंजूम चोप्रासारख्या दीग्गज खेळाडूंच्या वारसदार गवसतील. कोणती खेळाडू कोणत्या संघाकडे कीती कोटी रुपयांत गेली हे महत्वाचे नसून त्या संघात खेळताना तीने काय कामगिरी केली ते पाहिले गेले पाहीजे. त्यातच या लीगमध्ये अनेक परदेशी संघातील खेळाडू खेळत आहेत, त्यांचा खेळ पाहून किंवा केवळ त्यांच्यासह गडआऊटमध्ये व सरावात चर्चा करुनही आपल्या नवोदित खेळाडूंना खूप मोठा अनुभव मिळेल यात शंका नाही. त्यामुळेच लीगची श्रीमंती पैशांवरून नव्हे तर गुणवत्ता व कामगिरीवरून ठरावी.