खडकवासलातून विसर्ग 17 हजार पर्यंत वाढणार
पुणे : खडकवासला धरणापाठोपाठ आता पानशेत धरणही 99 टक्के भरले आहे. त्यामुळे पाऊस सुरू राहिल्यास पानशेत मधून पाणी सोडावे लागणार असल्याने खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. रात्री पासून खडकवासला धरणातून 15 हजार क्यूसेक सुरू असलेला पाण्याचा विसर्ग आज दुपारी सुमारे 17 हजार करण्यात येणार आहे. त्यामुळे रात्री पासूनच नदीपात्रातील रस्ता बंद करण्यात आला आहे. तर खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील पाणीसाठा 26 टीएमसी झाला असून मागील वर्षी पेक्षा 1 टीएमसी आधिक पाणी आहे.