राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी : दौंडमध्ये केंद्र सरकारविरोेधात निदर्शने
राहू – संसदेतील अधिवेशनामध्ये अनेक खासदारांचे निलंबन करण्यात आले. त्याला सर्वच स्तरातून विरोध होत आहे. हा निर्णय चुकीचा व हुकूमशाही पद्धतीचा असून लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न जुलमी केंद्र सरकारने केलेला आहे. हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, यासाठी दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून केंद्र सरकारचा जाहीर निषेध दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.
संसदेचा सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असून या विषयावर संसदेच्या सभागृहामध्ये चर्चा व्हावी, ही मागणी बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांनी हा संसदेच्या सुरक्षिततेचा विषय चर्चेस घ्यावा, अशी मागणी केली होती. या मागणीमुळे केंद्र सरकारने खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह १४९ खासदारांना निलंबित केले आहे.
सर्व खासदारांचे निलंबन तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी तहसीलदार यांच्यामार्फत सरकारकडे केली. सर्व खासदारांचे निलंबन सरकारने मागे न घेतल्यास न तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष सोहेल खान, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष रामभाऊ टुले, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस अजित शितोळे, दौंड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन काळभोर, दौंड तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा योगीनी दिवेकर, दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गायकवाड, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा योगिता जोंधळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीकांत दोरगे, महेश ताकवले, दौंड सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष आनंद शेलार, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.