सासवड – पुरंदर तालुक्यात तीव्र स्वरूपाचा दुष्काळ पडलेला असून शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे असे असून सुद्धा तालुक्यात कुठल्याही प्रकारे दुष्काळाचे व चार्याचे नियोजन केलेले दिसत नाही. मोठ्या प्रमाणावर पशुधन आहे. त्यांना जगण्यासाठी लागणार्या चार्याची टंचाई निर्माण झाली आहे. लवकरात लवकर चारा डेपो सुरू करावे त्यासाठी पुरंदरचे तहसीलदार विक्रम रजपूत यांना भाजपा किसान मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
शेतकर्यांच्या पुढे ही जनावरे व दुभत्या गायी जगवण्याची चिंता आहे. जनावरांचा प्रश्न गंभीर निर्माण झालेला आहे. शासनस्तरावर योग्य ती कारवाई होऊन लवकरात लवकर तालुक्यात विभागवार 6 ते 7 ठिकाणी चारा डेपो सुरू करण्यात यावेत या अगोदर देखील भाजपच्या वतीने चारा डेपो सुरू करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते.
आपण आजपर्यंत कोणतीही कार्यवाही केली नाही. दुधाचे कमी झालेले दर विकतचा चारा यामुळे दुष्काळ चक्रात शेतकरी भरडला जात आहे. यावेळी बारामती लोकसभा प्रमुख जालिंदर कामठे, माजी आमदार अशोक टेकवडे, किसान मोर्चा अध्यक्ष संदीप देवकर, भाजप उपाध्यक्ष भानूकाका जगताप, कैलस जगताप, गणेश मेमाणे, साकेत जगताप, महादेव शेंडकर, दिलीप कटके, काका निगडे, पी. एल. निगडे, विशाल कुदळे, अक्षय यादव, दत्तात्रय जगताप, शिवाजी शेंडकर, रोहित खवले, आदी उपस्थित होते.
लवकरच दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून चारा डेपो सुरू करण्यात येईल.
– विक्रम राजपूत, तहसीलदार पुरंदर