ग्रामविकास अधिकारी आजारी असल्याचा बनाव : ग्रामसभा तहकूब केली
बारामती – पारवडी येथील सरकारी गायरान गट क्रमांक.२९८ मधील अतिक्रमण कायदेशीर मार्गाने काढून टाकण्यासाठी ॲड प्रदीप गुरव यांनी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रजासत्ताक सत्याग्रह धरणे आंदोलन धरले आहे. मुख्यमंत्री सचिवालयापासून गटविकास अधिकारी यांनी आदेश देऊन ग्रामपंचायत धनदांडग्यांचे हित जोपासण्यासाठी कारवाई न केल्याने धरणे आंदोलन आरंभले आहे.
दरम्यान ग्रामसभेत अतिक्रमणाचा प्रश्न उपस्थित होईल म्हणून कोरम पूर्ण असताना ग्रामसभा तहकूब करण्यात आली. पारवडी गावचे ग्रामसेवक शिवाजी काळे यांच्याकडे सिध्देश्वर निंबोडी गावचा कार्यभार होता. पारवडी गावची ग्रामसभा होण्याअगोदर तेथील ग्रामसभेत ग्रामसभेत ग्रामविकास अधिकारी चक्कर येऊन पडल्याचा बनाव ग्रामसभेत करण्यात आला. त्यामुळे अतिक्रमणाच्या मुद्यावरून ग्रामपंचायतीने पळ काढल्याचे स्पष्ट झाले.
यावेळी उपसरपंच बाबासाहेब पोंदकुले यांनी ग्रामसभा तहकुब झाल्याचे जाहिर केले. कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वसंत गावडे यांनी अतिक्रमणाच्या प्रश्नावर ग्रामपंचायतीने भूमिका स्पष्ट करावी असा आग्रह केला. मात्र ग्रामसेवक आजारी पडल्याचा बनाव करून ग्रामसभा तहकूब केली.
अतिक्रमणामध्ये ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे सगे सोयरे गुंतले आहेत. गावात विकासकामांसाठी जागा शोधावी लागते. इतकं अतिक्रमण झाले आहे. भूमीहीन गरजू लोकांपेक्षा मोठ्या प्रमाणात स्थावर संपत्ती असणाऱ्यांनी गायरान जमिनीवर अधिक अतिक्रमण केले. जे बेकायदेशीर आहे.
– ॲड प्रदीप गुरव, आंदोलनकर्ते