काटेवाडी (गोकुळ टांकसाळे) : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या साखळी अन्नत्याग आंदोलनात काटेवाडी येथील सर्व मराठा बांधव सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात आंदोलनाला सुरुवात केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली त्या उपोषणाला आज सहा दिवस झाले आहेत. परंतु अजूनही मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत कोणताही निष्कर्ष निघला नसल्याने काटेवाडी (ता. बारामती) येथील सर्व मराठा समाज बांधवांनी एकत्र येऊन बारामती इंदापूर रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात एक दिवशीय लाक्षणिक उपोषणास सुरुवात केली आहे.
यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी घोषणा देण्यात आल्या त्याचबरोबर जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जो लढा उभारला आहे या लढा मध्ये सर्व मराठी बांधव सहभागी असून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही.
तोपर्यंत हा लढा कायम ठेवणार असल्याचे यावेळी सर्व मराठा बांधवांनी जाहीर केले. त्यामुळे खऱ्या अर्थाने संपूर्ण राज्यातील मराठा बांधव हा मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी एक जोडला असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही एकमेव भूमिका घेऊन संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मराठी समाजाच्या बांधवांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. त्यामुळेच काटेवाडी येथील मराठा समाज बांधवांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी साखळी उपोषणास सुरुवात केली आहे.