पाच गावांचा एकमुखी ठराव : प्रस्ताव शासन दरबारी सादर करणार
नायगाव : माळशिरस (ता. पुरंदर) येथील सूर्या लान्स ते पांडश्वरपर्यंत 2200 एलपीएस पाइपलाइन पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्याचा ठराव मावडी सुपे, पिसर्वे, पिंपरी, पांडेश्वर, रोमनवाडी, नायगाव या पाच गावांतील ग्रामस्थांनी एकमताने घेतला आहे.
पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून 2200 एलपीएस पाइपलाइनसाठी लाभार्थी शेतकर्यांची बैठक पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील नायगाव येथे नुकतीच पार पडली, त्यावेळी वरील निर्णय घेण्यात आला आहे.
या लाइनमुळे पाच गावांतील पाझर तलाव, बंधारे, नाले, गाव तळी भरणे शक्य होईल कारण छोट्या लाइनमुळे 250 ते 400 डिस्चार्ज मिळतो. मागणी असून सुद्धा पाणी मिळत नाही. त्यामुळेच हक्काची पिके घेता येत नाहीत.
हातातोंडाशी आलेली पिके पाण्याअभावी जळून जातात. त्यामुळे एका पंपांचे पाणी बसेल अशी मोठी पाइपलाइन ज्यामध्ये 2000 ते 2200 चा डिस्चार्ज मिळेल व पाच गावांतील पाझर तलाव, बंधारे, नाले,गाव तळी भरणे शक्य होईल.
वेळेत पाणी मिळेल. पिकांची भरणी वेळेत होतील.पण छोट्या लाइनमुळे ती होत नाहीत. पाणी मिळण्यासाठी अधिकारी यांच्याशी वारंवार शेतकर्यांना हुज्जत घालावी लागते. त्यामुळे मोठी लाइन करण्याच्या मागणीसाठी सर्व शेतकर्यांचे एकमत झाले आहे.
2200 एल पी एस लाइन होणे अत्यंत गरजेचे असून शासनाने ती त्वरित मंजूर करून काम करावे. पुरंदर उपसा सिंचन योजनेचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. आता दुष्काळी परिस्थिती असून योजना बंद ठेवणे योग्य नाही.
– प्रकाश मारणे, शेतकरी, पिंपरी
पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी तासाने देण्यापेक्षा तळी, नाले, बंधारे यांची जी क्षमता आहे. त्याप्रमाणे पैसे घ्यावेत. पाण्याचे मीटर बसवावेत.
– संजय जगताप, शेतकरी, पांडेश्वर