नदी प्रदूषण मुक्तीला तिलांजली : पालिकेचे कोणी ऐकेना
आळंदी – येथील इंद्रायणी नदी घाटावर स्थानिक नागरिकांसह जवळपासच्या गावाच्या परिसरातील नागरिकांनी घरातील अंथरूण-पांघरूणासाठी वापर करण्यात येणाऱ्या गोधडया, ब्लॅंकेट, चादर धुण्यासाठी इंद्रायणी नदी घाटावर मोठी गर्दी केली होती. त्यामुळे घाटावर वाळत टाकलेल्या विविध रंगाच्या गोधड्या आणि ब्लॅंकेटने येथील परिसर फुलून गेला होता.
इंद्रायणी नदीवर गणेश विसर्जनास बंदी घालण्यात आली होती. त्या कालावधीत एकाही गणेश मूर्तीचे नदीत विसर्जन करण्यात आले नव्हते; परंतु नवरात्र उत्सव तोंडावर येऊन ठेपला असून, गेली चार-पाच दिवसांपासून नागरिक गोधड्या व इतर कपडे धुण्यासाठी इंद्रायणी नदीवर येत आहेत. त्यामुळे संपूर्ण नदीवर गोधड्या वाळत घालण्याचे चित्र आहे.
या ठिकाणी पालिकेचा कर्मचारी येऊन सर्वांना सूचना देत आहे की, नदीवर गोधड्या धुण्यास बंदी आहे. तरी देखील कोणीही ऐकायला तयार नाही राजेरोसपणे गोधड्या धुऊन इंद्रायणीचे पावित्रे नष्ट करण्याचे काम असल्याने पालिकेने वेळीच आळा घालावा अशी मागणी आहे.