भोर – भोर तालुका हा दुर्गम, डोंगरी आणि अतिपर्जन्य वृष्टीचा तालुका असून, या तालुक्यात प्रवाशांच्या दळणवळणासाठी राज्य परिवहन मंडळाकडून गेल्या अनेक वर्षांत एकही नवी बस देण्यात आलेली नाही. ज्या बस आहेत त्या अपु-या असून, जीर्ण झालेल्या आहेत, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, किमान १५ बस उपलब्ध व्हाव्यात आणि आगाराच्या आवारातील काँक्रिटीकरणासाठी भरीव निधी उपलब्धा करून द्यावा अशी मागणी भोर शहर भाजपचे अध्यक्ष सचिन कन्हेरकर यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
मंत्री रामदास आठवले हे फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे संस्थापक प्रा. डॉ. रोहिदास जाधव लिखित ‘सम्यक संवाद’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी भोरला आले होते, यावेळी त्यांनी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अश्वासन दिले. यावेळी भोर शहर भाजपतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपचे भोर तालुका अध्यक्ष जीवन कोंडे, भोर शहराध्यक्ष सचिन कन्हेरकर, जिल्हा सदस्य संतोष लोहकरे, भोर शहर उपाध्यक्ष दत्तात्रय झांजले, सरचिटणीस अॅड. कपिल दुसंगे,युवा वॉरिअर्स अध्यक्ष रोहन भोसले, मच्छीमार संघटना अध्यक्ष सुरेश कांबळे, पल्लवी फडणीस, मनीषा राजिवडे, मयूर गुजर, सुनील पांगारे, धाराशिवकर, राजाभाऊ शिंदे, अमोल भाले, विशाल दुसंगे, केदार साळुंके, साठे मॅडम, आंबडकर मॅडम, बांदल मॅडम आणि भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.