शिरूर -केंद्र शासनाने संसदेत मंजूर केलेली विधेयके शेतकरी विरोधी असल्याने ते त्वरित मागे घेण्यात यावीत, अशी मागणी शिरुर तालुका कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन शिरूरच्या तहसीलदारांना देण्यात आले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग चे पालन करून शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये कॉंग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून शिरूर कॉंग्रेसच्या वतीने जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे खजिनदार महेश ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदारांना निवेदन देऊन या विधेयकाचा निषेध करण्यात आला.
यावेळी शिरूर कॉंग्रेसचे अध्यक्ष वैभव यादव, शिरूर शहर अध्यक्ष किरण आंबेकर, शिरूर शहर महिला अध्यक्षा ज्योती हांडे, उपाध्यक्ष शितल आनंदे, कल्पना पुंडे, शिरूर शहर युवक अध्यक्ष अमजद पठाण, पापाभाई पठाण, शिरूर आंबेगाव विधानसभा अध्यक्ष यशवंत पाचंगे, विजय डिंबर, उमेश काळे, फैजल शेख, अभय सुराणा, प्रदीप मेहकरे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.