पुणे – धानोरीमधील किसान कल्याण निधी प्रा.लि.कंपनीकडून पिग्मी एजंटसह 67 गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यांनी एकूूण 14 लाख 24 हजाराची फसवणूक केली असून कार्यालय बंद करुन पळ काढला आहे.
कंपनीचे संचालक प्रमोद सुरेश गावडे(45,रा.फलटण , जि.सातारा), संतोष आटोळे (रा.बारामती), गिरीश यशंवत घाग(रा.धानोरी) यांच्यावर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात . याप्रकरणी पिग्मी एजंट सोमनाथ विरभद्र जंगम( रा.लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार कंपनीचे धानोरी व फलटण येथे कार्यालय आहे.
फिर्यादी त्यांच्याकडे पिग्मी एजंट म्हणून काम करत होता. भाजीपाला- फळ विक्रेते आदींकडून तो दररोज 100 ते 500 रुपये गोळा करुन कंपनीत भरत होता. ही गुंतवणूक 2018 ते ऑगस्ट पर्यंत नियमीत सुरु होती. मात्र त्यांनतर गुंतवणूकदारांना पैसे मिळाले नाहीत.
यामुळे 22 नोव्हेंबर 2020 रोजी गुंतवणूकदारांनी पोलीसांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. तेव्हा तक्रारदारांना आरोपींनी पैसे देणार असल्याचे वचन दिल्याने गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र यानंतर संचालकांनी धानोरी येथील कार्यालयाला कुलूप लावून गाशा गुंडाळण्यात आला आहे. गुंतवणूकदारांचे सर्व पैसे घेऊन संचालक प्रमोद गावडे हा पळून गेला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक लहू सातपुते करत आहेत.