पुणे – धारदार शस्त्राने मानेवर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उत्तमनगर भागात घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी सागर गायकवाड याला अटक केली होती. त्याला सत्र न्यायाधीश एस.एस.गुल्हाणे यांनी 25 हजाराचा जामीन मंजुर केला आहे. त्याने ऍड. अजित पवार आणि ऍड. प्रणित नामदे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होत. त्याच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे इतर जास्त गुन्हे दाखल नाहीत. दोघे एकाच गावचे असून, त्याला खोट्या गुन्ह्यात अडकाविल्याचा युक्तीवाद बचाव पक्षाने केला.
हवेली तालुक्यातील बाहुली येथील व्यक्तीवर 30 जून रोजी हल्ला करण्यात आला. सागर आणि फिर्यादी एकाच गावचे आहेत. फिर्यादी, पत्नी, सागर आणि इतर गावातील सर्वजण टेम्पो करून आषाढी एकादशीसाठी पंढरपूर येथे गेले होते.
माघारी गावाकडे जात असताना फिर्यादींना फोन केला. त्यावेळी “तु मला मारण्यासाठी तुझ्या भावाला फोन करून लोकांना बोलविले आहे का, तु लय जमिनीचे व्यवहार करतो आहे, असे म्हणत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जखमी व्यक्ती, प्रत्यक्षदर्शी साक्षदाराच्या सांगण्यावरून पोलिसांनी सागर गायकवाड अटक केलेली होती.