पुणे :- खेड तालुक्यातील चास कमान धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून आतापर्यंत 215 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे धरणाचा पाणीसाठा 93 टक्यांवर पोहोचला आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले असून एकुण पाच दरवाज्याव्दारे 3,900 क्युसेक वेगाने पाणी भिमा नदी पात्रात सोडण्यात येत आहे.
त्यामुळे भीमानदी काठाच्या नागरिकांनी नदीपात्रात उतरु नये. वाहने नदीपात्रात लावू नयेत. सखल भागातील नागरिकांना सतर्क रहावे. तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.