पुणे – थंडीचा वाढता कडाका आणि सकाळी पडत असलेल्या दाट धुक्यामुंळे रस्ते वाहतुकीसह हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. सलग चौथ्या दिवशी पुण्यातून येणारी आणि जाणारी पाच विमाने रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आजही प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
उत्तरेत पडलेल्या दाट धुक्यांचा परिणाम विमान सेवेवर झाला असून, दररोज दिल्ली, अलाहाबाद, वारानसी यासह उत्तर भारतात जाणार्या मार्गावरील उड्डाणे रद्द झाली आहे. तर काही विमानांना उशीर होत असल्यामुळे प्रवाशांना विमानतळावर व्हेटींगवर थांबावे लागत आहे. मागील चार दिवसात 50 ते 60 विमाने रद्द झाली आहेत. तर, अनेक विमानांना उशीर झाला आहे.
यामध्ये बुधवारी पुण्यात येणारी तीन आणि पुण्यातून जाणारी दोन अशी पाच विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत. त्यामध्ये अहमदाबाद, वारानसी, चंदीगड, गुवाहटी, गोवा या शहरातील विमानांची उड्डाणे रद्द झाली. त्यामुळे या शहरांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे खूप हाल झाले. विमाने रद्द होण्याबरोबरच अनेक विमानांना उशीर देखील झाला. त्यामुळे प्रवाशांना विमानतळावर ताटकळ थांबावे लागले.