पुणे- डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व पुणे महानगरपालिका यांच्या पुढाकाराने पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात स्वच्छ भारत अभियान राबवण्यात आले. यावेळी शहरात 190 टन 60 किलो कचरा गोळा करण्यात आला.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात आले.
सर्व क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत कोथरूड, केळेवाडी मधील मोगल चौक ते कंपनी गेट, किष्किंधानगर, सुतारदरा मैदान, पर्वती टेकडी, पर्वती जनता वसाहत चुनाभट्टी कॉर्नर, गोसावीवस्ती, वारजे कर्वेनगर जलशुद्धीकरण प्रकल्प, होम कॉलनी वडारवाडी, खानवस्ती रोड, रामनगर, येरवडा, कळस, धानोरी, स्वीपर चाळ, भैयावाडी, मदारवस्ती, धनकवडी, राऊतबाग धनकवडी, कात्रज नवीन वसाहत, कात्रज तलाव, गुगळे प्लॉट, इत्यादी ठिकाणी मोठया प्रमाणावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावेळी नागरिकांनीही सहभाग घेतला.
यामध्ये शहरातील विविध ठिकाणच्या 60 झोपडपट्ट्यांमधील 8.5 किलोमीटर परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. अभियानाचा शुभारंभ सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त आशा राऊत, माजी विरोधीपक्षनेत्या दीपाली धुमाळ, आरोग्य अधिकारी केतकी घाटगे आदी उपस्थित होते.