नवी दिल्ली, दि. 3 – भारत व रशिया यांच्या परस्परांतील 20 वर्षांच्या आर्थिक सहकार्याचा आढावा घेऊन या सहकार्याचे क्षेत्र वाढविण्यासंबंधी नियोजन मंडळे चर्चा करणार आहेत. पंतप्रधान इंदिरा गांधी रशियाचा दौरा करतील, तेव्हा चर्चेच्या प्रमुख विषयात आर्थिक सहकार्य हा एक विषय असेल असे ठरले होते. परंतु पंतप्रधानांचा दौरा सध्या स्थगित झाल्याने दोन्ही देशांची नियोजन मंडळे आता याविषयी चर्चा करतील, असे समजते.
तरुण वर्ग निराश
कोल्हापूर – आर्थिक नियोजनाचा प्राधान्यक्रम चुकला म्हणूनच तरुण वर्ग निराश आहे, असे दापोलीच्या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू चव्हाण यांनी आपले मत मांडले.
मार्गदर्शक तत्त्वे ही मूलभूत हक्कांपेक्षा महत्त्वाची
कोल्हापूर – सामाजिक अन्यायाचे निर्मूलन करून समतेवर आधारित कल्याणकारी राज्य निर्माण करण्याची घटनेतील प्रतिज्ञा सफल करण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करीन. आपले स्वातंत्र्य हे अंतिम साध्य नसून ते साधन होय हे ओळखून आज काम करण्याची गरज आहे. घटनेतील मार्गदर्शक तत्त्वे ही मूलभूत हक्कांपेक्षाही महत्त्वाची मानतो, असे राज्याचे ऍडव्होकेट जनरल रामराव आदिक म्हणाले.
संकरित वासरांची पैदास वाढवा
लातूर – संकरित वासरांची पैदास वाढवून दुग्ध व्यवसायास चालना देणारी गरज असून शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून आर्थिक परिस्थिती सुधारण्यात सहाय्य झाले पाहिजे व गुरांकडे लक्ष द्यावे असे संभाजीराव पाटील म्हणाले.