मुंबई – भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आल्यावर याच ठिकाणी त्यांचे स्मारक उभे करण्याची मागणी आता करण्यात येत आहे. त्यावरून सध्या राज्यात दोन गट निर्माण होताना दिसत आहे. भाजपा व काँग्रेसने या मागणीला पाठिंबा दिला आहे तर दुसरीकडे भारिप बहुजन महासंघाचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शिवाजी पार्क मैदान हे खेळासाठीच असावे, अशी भूमिका मांडली आहे. आपला या मागणीला विरोध असल्याचे स्पष्ट मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान पत्रकरांनी लता मंगेशकर यांनी आंबेडकरांची गाणी गायली नाही, याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला त्या वेळी ते म्हणाले,’लता मंगेशकरांनी आंबेडकरांची गाणी गायली नाही, हे त्या जिवंत असताना विचारायला हवं होतं, असं आंबेडकर म्हणाले. ते पुढे म्हणाले,’ . प्रत्येकाचे प्रिन्सिमल् असतात, असं म्हणत त्यांनी लता मंगेशकरांनी आंबेडकरी गाणी का गायली नाहीत, जशी त्यांनी आंबेडकरांची गाणी गायली नाहीत, तशीच त्यांनी सरदार पटेल आणि नेहरुंचीही गाणी गायली नाही, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हणाले आहे.