Prakash Ambedkar on cm। लोकसभा निवडणुकीच्या पहिलय टप्प्याचे मतदान पार पडले. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रचार दरम्यान,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत मोठा दावा केलाय. एकनाथ शिंदेंचं काम आता संपलं आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. प्रकाश आंबेडकर यांनी हिंगोलीत डॉ. बी. डी. चव्हाण यांची प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली.
घटना बदलल्याशिवाय राहणार नाहीत Prakash Ambedkar on cm।
पंतप्रधानांवर टीका करताना, “नरेंद्र मोदी २०२४ ला पुन्हा सत्तेत आले तर आता निवडणूक होणार नाही. देशाचा चेहरामोहरा पूर्ण बदलून जाईल. जो ऐकणार नाही त्याला तुरुंगात डांबतील. मोदी सत्तेत आल्यास सीएए आणि एनआरसी लागू करतील. बाबासाहेब आंबेडकर आले तरीही संविधान बदलू शकणार नाहीत अशी ग्वाही दिली जाते आहे. मात्र मोदी सत्तेत आल्यास ते घटना बदलल्याशिवाय राहणार नाही. हे बदलायचं असेल तर मोदींच्या विरोधात मतदान करा” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
शिंदे पुढच्या दोन महिन्यांत दिसणार नाहीत Prakash Ambedkar on cm।
पुढे मुख्यमंत्र्यांविषयी खळबळजनक दावा करताना, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काम संपलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर दोन महिन्यांनी तुम्हाला एकनाथ शिंदे दिसणारही नाहीत. एकनाथ शिंदेंचा म्हणावा तसा फायदा लोकसभेला दिसला नाही तर वेगळं चित्र दिसू शकतं” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
१७ लाख लाख कुटुंबांनी देश सोडला
प्रकाश आंबेडकर त्यांच्या भाषणात म्हणाले की, १७ लाख कुटुंबांनी देश सोडला आहे. हे लोक मुस्लिम किंवा ख्रिश्चन नाहीत तर हिंदू आहेत. त्यांची मालमत्ता ५० कोटी आहे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विचारतो आहे तुम्ही कोणत्या तोंडाने मोदींना मतं द्यायला सांगत आहात तुम्हाला लाज कशी वाटत नाही? असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
हेही वाचा
‘भाजपकडे सत्तागेली तर लोकशाही राहणार नाही’ – शरद पवार