लोकशाही टिकण्यासाठी लोकशिक्षण आवश्यक
विजयवाडा, दि. 04 – या देशात लोकशाही टिकण्यासाठी जनजागृती झाली पाहिजे. लोकशाहीला आणि नागरी स्वातंत्र्याला असलेल्या धोक्याबाबत लोकांना शिक्षण देण्याची जरुरी आहे, असे उद्गार जयप्रकाश नारायण यांनी काढले.
भारतीय आरमाराच्या आधुनिकीकरणाची योजना
नवी दिल्ली – भारतीय आरमाराचा विस्तार आणि आधुनिकीकरण करण्याच्या नव्या योजना संरक्षण मंत्रालयात निश्चित केल्या जात आहेत. सध्या आरमाराला क्षेपणास्त्राची व्यवस्था असलेल्या बोटीची, हेलिकॉप्टरवाहू फिगेटसची जरुरी आहे.
अजूनही काही राज्यांत वेठबिगारीची पद्धत चालू!
नवी दिल्ली – देशात अजूनही काही राज्यांत व काही केंद्रशासित प्रदेशात वेठबिगारीची पद्धत या ना त्या स्वरूपात अस्तित्वात आहे. वेठबिगारीने काम करून घेणे हा भारतीय दंड विधानाच्या 386 व्या कलमाखाली गुन्हा ठरविण्यात आला असूनसुद्धा वेगळ्या स्वरूपात ही पद्धत चालू आहे.
भारताला युद्धाचा धोका
नवी दिल्ली – सिक्कीमला भारतात समाविष्ट करणे तसेच काश्मीरमधील नेतृत्वात झालेला बदल या गोष्टींचा राजकीय फायदा उठविण्यासाठी आपल्या शेजारील शत्रूराष्ट्रे नजिकच्या काळात युद्ध सुरू करण्याची शक्यता नाकारता येत नाही.