नवी दिल्ली – नीट परिक्षा केंद्र सरकारने पुढे ढकलाव्यात अशी मागणी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. सरकार विद्यार्थ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करीत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. सुप्रीम कोर्टाने कालच नीट परिक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला होता.
नीट म्हणजे नॅशनल इलिजीबीलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट. ही परिक्षा 12 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ही परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. 12 सप्टेंबरच्या सुमाराला अनेक परिक्षा असल्याने नीटची परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात केली होती.
पण या क्षणी या परिक्षांच्या प्रक्रियेत आम्हाला हस्तक्षेप करावासा वाटत नाही, आणि असा हस्तक्षेप अयोग्य ठरेल असे मत नोंदवत सुप्रीम कोटाने ही परिक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला होता.