नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी राम मंदिर बांधण्यासाठी भूमिपूजन करतील. एकीकडे अयोध्येत भूमिपूजन कार्यक्रमासाठी जल्लोषात तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे राजकारण देखील पाहायला मिळत आहे. कॉंग्रेसने यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला म्हणाले, “राजकारणाचा धर्म असावा पण धर्माचे राजकारण नसावे, हेच रामांची मर्यादा आहे” तसेच राम मंदिर कार्यक्रमाच्या २४ तास आधी मी कोणतीही राजकीय भाष्य आणि टीका करणार नसल्याचे सुरजेवाला यांनी स्पष्ट केले.
I would refrain from making any political comment just 24 hours before #RamTemple event, but I must say ‘rajniti ka dharm hona chahiye, dharm ki rajniti nahi, yahi Ram ki maryada hai’: Randeep Singh Surjewala, Congress pic.twitter.com/NohDrXyukZ
— ANI (@ANI) August 4, 2020
मंगळवारी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ट्विटरवर त्यांचा प्रोफाइल फोटो बदलला. नव्या फोटोमध्ये ते भगवा चोला परिधान करताना दिसत आहे. याखेरीज भूमिपूजन हे राष्ट्रीय ऐक्य, बंधुत्व आणि सांस्कृतिक मंडळासाठी एक संधी बनली पाहिजे. राम सर्वांमध्ये आहेत आणि ते सर्वांचे आहेत, असे मत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी व्यक्त केले.
रामायणाची जगाच्या आणि भारतीय उपखंडातील संस्कृतीत खोलवर छाप आहे. भगवान राम, माता सीता आणि रामायण यांची कथा प्रकाशंजसारख्या हजारो वर्षांपासून आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक आठवणींमध्ये उजळल्या असल्याचे देखील प्रियांका गांधी एका निवेदनात म्हणाल्या.
सरलता, साहस, संयम, त्याग, वचनवद्धता, दीनबंधु राम नाम का सार है। राम सबमें हैं, राम सबके साथ हैं।
भगवान राम और माता सीता के संदेश और उनकी कृपा के साथ रामलला के मंदिर के भूमिपूजन का कार्यक्रम राष्ट्रीय एकता, बंधुत्व और सांस्कृतिक समागम का अवसर बने।
मेरा वक्तव्य pic.twitter.com/ZDT1U6gBnb
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) August 4, 2020
कॉंग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी राम मंदिर भूमिपूजनावरून नरेंद्र मोदींना लक्ष केले. 5 ऑगस्ट रोजी होणारा अशुभ मुहूर्त पुढे ढकलला जावा. शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर भगवान राम मंदिराच्या बांधकामाचा योग आला आहे, तुमच्या आडमुठेपणाने हे अडथळा आणू नका, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले.