पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची आजच्या घडीला अशी राजकीय विश्वासार्हता आहे की पंतप्रधान पद लांबच राहीले, ते राज्याचे मुख्यमंत्री राहतील का यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अशी टीका राजकीय रणनितीज्ञ प्रशांत किशोर यांनी केली आहे. ते म्हणाले की नितीश यांचे भारतीय जनता पार्टीची साथ सोडून महाआघाडीत सहभागी होणे हीच विशेष घटना ठरली आहे असे माझे मत आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान की राघव चढ्ढा? माजी मुख्यमंत्र्यांचा ‘आप’ला सवाल
नितीश यांनी विश्वासार्हता गमावली आहे. त्यांनी 2025 मधील बिहार विधानसभेच्या निवडणुका तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढवण्याची घोषणा केली आहे. मात्र 2025 पर्यंत थांबायचेच कशाला? आजही महाआघाडीत तेजस्वी यांचा राष्ट्रीय जनता दल सगळ्यांत मोठा पक्ष आहे. नितीश यांनी त्यांना आताच मुख्यमंत्री करून टाकावे. असे केल्याने नितीश यांना तेजस्वी यांच्यासोबत काम करण्याची तीन वर्षे संधी मिळेल आणि बिहारच्या जनतेलाही ते पाहता येईल की तेजस्वी यांनी किती चांगले काम केले.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान की राघव चढ्ढा? माजी मुख्यमंत्र्यांचा ‘आप’ला सवाल
बिहारमध्ये सध्या गाजत असलेल्या दारूच्या मुद्द्यावर प्रशांत किशोर म्हणाले की नितीश कुमार अभियंते आहेत. त्यांनी त्याच बुध्दीचा वापर करून बिहारमध्ये दारूबंदी जाहीर केली आहे आणि फ्लिपकार्ट आणि अमेझॉनच्या माध्यमातून घरपोच डिलीवरी सुरू केली. दारूबंदीमुळे बिहारचा महसूल 20 हजार कोटींनी कमी झाला आहे. जर 20 हजार कोटी मिळाले तर त्यातून शाळा, रूग्णालये बांधता येतील. अन्य सुविधाही उभारता येतील.