मुंबई – पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. गृहविभागातर्फे 7 हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया जून महिन्यामध्ये पार पडण्याची शक्यता आहे. लवकरच यासंबंधीची जहिरात देखील काढली जाणार आहे. त्यादृष्टीने गृहखात्याची सगळी तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती मिळत आहे.
गेल्या दोन वर्षापासून देशासह राज्यात कोरोनाच्या संकटामुळे नोकरभरतीची प्रक्रिया थांबली होती. कोरोनाचा फटका पोलीस भरती प्रक्रियेलाही बसला. आवश्यकता असतानाही राज्यात पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होऊ शकली नाही. राज्याची लोकसंख्या लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर पोलीस बळाची गरज आहे. आता त्यामुळे राज्य सरकाराने सुरू केलेल्या हालचालीमुळे पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच पोलिस भरतीबाबत माहिती दिली होती. 50 हजार पदांच्या भरतीबाबत मंत्रिमंडळ विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले होते.