रेडा- राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इंदापूर शहरात इंदापूर पोलीस व राज्य राखीव दलाच्या तुकडीच्या जवानांनी इंदापूर शहरात पथसंचलन करून कायदा व सुव्यवस्था व शहरात शांतता राखावी, असे आवाहन केले. पोलीस निरीक्षक मधुकर पवार म्हणाले की, सध्या राज्यात राजकीय घडामोडींना मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे पथसंचलन करण्यात आले आहे.
यावेळी इंदापूर शहरात पोलीस व राज्य राखीव दलाच्या 25 जवानांनी सहभाग घेतला होता, शहरातून पोलीस स्टेशन ते इंदापूर महाविद्यालय, नारायणदास रामदास हायस्कूल, मुख्य पेठ, प्रशासकीय भवन, आदी मार्गावर पथ संचलन करण्यात आले. यावेळी वाहतूक नियंत्रण कक्षाचे नानासाहेब आटोळे, काकासाहेब पाटोळे यांनी सहभाग घेतला.