नवी दिल्ली – देशात महागाई आणि बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे, त्या विषयी पंतप्रधान मोदींना उत्तर द्यावेच लागेल, असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
एका ट्विटर संदेशात त्यांनी म्हटले आहे की, सध्या महागाईचा दर गेल्या 35 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर आहे, तर बेरोजगारीचा दर 45 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर आहे. अशी स्थिती असताना पराठ्यावर 18 टक्के जीएसटी का लावला जात आहे, शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर 12 टक्के दराने जीएसटी का लावला जात आहे, असे प्रश्न त्यांनी मोदींना विचारले आहेत.
हिमाचलमध्ये निवडणुक जाहीर होताच आला ‘हा’ सर्वे; पुन्हा भाजपचीच सत्ता येणार? https://t.co/bfrmYzYHxQ
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 14, 2022
भारत जोडो यात्रेच्या निमीत्ताने तुम्हाला हे आणि अशा स्वरूपाचे अन्य प्रश्न सतत विचारले जातील, त्याची उत्तरे पंतप्रधान मोदींना द्यावी लागतील असे ते म्हणाले. भारत जोडो यात्रा सुरू असल्यामुळे राहुल गांधी यांनी आज बऱ्याच दिवसांनी ट्विटरचा वापर करीत पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.
देशापुढील महत्वाचे विषय सोडून भाजपचे लोक भलतेच विषय उपस्थित करून देशातील जनतेचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप कॉंग्रेसकडून सातत्याने केला जात आहे.