नवी दिल्ली – भारतातील पाच राज्यांमध्ये (5 state election result) झालेल्या चार विधानसभा निवडणुकांचे निकाल आले आहेत. या निकालांवर विदेशी माध्यमांनी (foreign media) भाजपचे विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचे कौतुक केले आहे. काहींनी या निकालांना २०२४ साठी भाजपला मोकळा मार्ग म्हटले आहे, तर काहींनी विरोधी ऐक्यासाठी स्थापन केलेल्या आघाडीसाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले आहे. ( 4 state assembly election Result)
हिंदी हार्टलँडमध्ये भाजप अजिंक्य
बीबीसीने (bbc pm modi) लिहिले की, राज्य निवडणूक निकालातील विजयाने पंतप्रधान मोदींच्या लोकसभा निवडणुकीत विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. उत्तर आणि मध्य भारतातील हिंदी केंद्रस्थानी भाजप जवळजवळ अजिंक्य दिसत आहे. पुढच्या वर्षी विक्रमी तिसर्या टर्मवर आधीच आपली दृष्टी ठेवणाऱ्या भाजपासाठी हे निकाल लक्षणीय आहेत. काँग्रेसच्या हातून राजस्थान गमावणे चिंताजनक आहे. (Bjp win)
मतदारांचा मूड स्पष्ट
अल जझीराने (Al Jazeerapm modi) लिहिले की, या निवडणूक निकालांनी पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदारांचा मूड स्पष्ट केला आहे. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याकडे मोदींचे लक्ष लागले आहे. काँग्रेसला तेलंगणावरच समाधान मानावे लागले. राजस्थानमध्ये ती आपले सरकार वाचवू शकली नाही. तब्बल २८ विरोधी पक्षांची “इंडिया’ युती भाजपला आव्हान देण्यासाठी अजिबात सक्षम असल्याचे दिसून आले आहे.
विरोधकांच्या पराभवासाठी भाजप सज्ज
ब्लूमबर्गने (Bloomberg pm modi) लिहिले की, तीन प्रमुख राज्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर भारताचा सत्ताधारी पक्ष पुन्हा लोकसभा निवडणुकीत विरोधकांना पराभूत करण्यासाठी सज्ज झाला आहे. नरेंद्र मोदी यांना मतदारांकडून मिळालेला हा जोरदार पाठिंबा आहे. काँग्रेससाठी सर्वात मोठा धक्कादायक निकाल राजस्थानचा होता, जिथे त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.(Bjp Vs Congress)
पकड आणखी मजबूत
फायनान्शिअल टाईम्सने (Financial Times Pm modi) लिहिले की, नरेंद्र मोदी यांच्या भाजपने मोठा विजय नोंदवला, ज्यामुळे पुढील वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी राष्ट्रीय राजकारणावर आपली पकड आणखी मजबूत होईल. हे निवडणूक निकाल म्हणजे उत्तर भारतातील विरोधकांचा सफाया केल्यासारखे आहेत.
भारत जोडो यात्रेची जादू चालली नाही
नेपाळच्या अग्रगण्य दैनिक कांतीपूरने लिहिले, या निकालावरून असे दिसून आले आहे की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा आणि अन्य प्रयत्नांची जादू हिंदी भाषिक राज्यांमध्ये दिसून आली नाही.