PM Modi In Sambhal । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी उत्तर प्रदेशातील संभलमध्ये कल्की धामची पायाभरणी केली. वैदिक मंत्रांनी पंतप्रधानांनी कल्की धाम मंदिराचे भूमिपूजन केले. लोकसभा निवडणुकीपूर्वी, अयोध्येतील राम मंदिरानंतर हे दुसरे मोठे आध्यात्मिक ठिकाण आहे, ज्याची पंतप्रधानांनी पायाभरणी केली . यावेळी पंतप्रधानांनी “जी काही चांगली कामं राहिली आहेत ती पूर्ण करणार असल्याचे म्हटले.
यावेळी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आचार्य प्रमोद कृष्णमही बसलेले दिसले. हे मंदिर श्री कल्की धाम निर्माण ट्रस्टने बांधले आहे. त्याचे अध्यक्ष आचार्य प्रमोद कृष्णम आहेत. या कार्यक्रमात देशभरातून 11000 हून अधिक साधू-मुनी सहभागी झाले आहेत. तसेच, मंदिराच्या पायाभरणी समारंभाला अनेक धर्मगुरू आणि मान्यवर उपस्थित होते.
कल्की धाम मंदिराच्या पायाभरणीचे सौभाग्य लाभले
संभलमधील हिंदू तीर्थक्षेत्र कल्की धामच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधान मोदींनी, “आज संतांच्या भक्ती आणि लोकांच्या भावनेने आणखी एका पवित्र स्थानाची पायाभरणी केली जातीय. आचार्य आणि संतांच्या उपस्थितीत भव्य कल्की धामची पायाभरणी करण्याचे सौभाग्य मला लाभले. मला विश्वास आहे की कल्की धाम भारतीय श्रद्धेचे आणखी एक महान केंद्र म्हणून उदयास येईल.
पंतप्रधानांकडून प्रमोद कृष्णम यांचे कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “या प्रसंगी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना आदरांजली अर्पण करतो. अलीकडेच प्रमोद कृष्णम जी मला निमंत्रण देण्यासाठी आले होते आणि त्यांनी मला सांगितलेल्या गोष्टींच्या आधारे आज ते जेवढा आनंद घेत आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आनंद त्याची आई घेत असावी असे मला वाटते.असे पंतप्रधान म्हणाले. हे मंदिर विशेष असणार आहे. हे मंदिर असे असेल ज्यामध्ये 10 गर्भगृहे असतील आणि देवाचे सर्व 10 अवतार विराजमान असतील, असे त्यांनी सांगितले.
पीएम मोदी म्हणाले की, आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले होते की प्रत्येकाकडे काहीतरी देण्यासारखे आहे परंतु माझ्याकडे काहीही नाही, मी फक्त माझ्या भावना व्यक्त करू शकतो. प्रमोद जी, तुम्ही मला काहीच दिले नाही हे बरे झाले, नाहीतर काळ असा बदलला आहे की, सुदामाने श्रीकृष्णाला तांदूळ दिला असता आणि व्हिडिओ समोर आला असता तर सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली असती आणि निर्णय आला असता की भगवान श्रीकृष्णाला भ्रष्टाचारात काहीतरी दिले होते आणि भगवान श्रीकृष्ण भ्रष्टाचार करत होते. आपण आपल्या भावना व्यक्त केल्या आणि काहीही दिले नाही तर ते चांगले होईल.
संभल येथील हिंदू तीर्थक्षेत्र कल्की धामच्या पायाभरणी समारंभात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत आपण एक नवीन भारत पाहिला आहे. भारत विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जात आहे. सीएम योगी म्हणाले की, आज जागतिक मंचावर पंतप्रधान मोदींचा सन्मान होत आहे. देशाच्या सर्व सीमा पूर्णपणे सुरक्षित आहेत.