BCCI & Ranji Matches : – इशान किशऩच्या ( Ishan Kishan ) उदाहरणावरून सावध झालेल्या बीसीसीआयने आता देशभरातील सर्व खेळाडूंना प्रत्येक वर्षी किमान तीन ते चार रणजी सामने खेळा अन्यथा आंतरराष्ट्रीय संघ निवडीसाठी त्यांचा विचार केला जाणार नाही, असे सुनावले आहे.
इतकेच नव्हे तर जे खेळाडू गुणवत्तेनूसार निवड समिताला प्रभावीत करत आहेत व त्यांना विविध संघ मालकांनी आयपीएल स्पर्धेसाठी हेरुन ठेवले असेल तर त्यांचा लिलावात पुकारा होण्यापूर्वी त्यांनी काही ठरावीक संख्येने रणजी सामने खेळणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच हे आदेश आयपीएल स्पर्धेतील सर्व संघांच्या मालकांनाही सुचीत करण्यात आले आहे. त्याशिवाय कोणत्याही खेळाडूला लिलावात सहभागी करुन घेतले जाणार नाही. तसेच ट्रेडिंगद्वारेही संघांना या खेळाडूंना आपल्या संघात घेता येणार नाही.
तरुण, नवोदित खेळाडून घरगुती क्रिकेट स्पर्धामध्ये खेळणे टाळतात. त्यामुळे स्पर्धांकडे प्रेक्षकही पाठ फिरवतात म्हणून बीसीसीआयने हे कठोर पाऊल उचलण्याचा विचार करत होते. त्यामुळे आयपीएल ते आयपीएल’ खेळण्याच्या प्रवृत्तीला आळा बसेल. सध्या भारतीय संघातून बाहेर असलेले खेळाडूच केवळ टी-२० मुश्ताक अली करंडक स्पर्धेत खेळतात.
अलीकडेच यष्टिरक्षक ईशान किशन याने दक्षिण आफ्रिका दौऱ्याहून परत आल्यावर वर्कलोडचे कारण पुढे करीत झारखंडकडून रणजी सामना खेळण्यास नकार दिला होता. परंतु हार्दिक पंड्याससह तो आयपीएलसाठीचा सराव करताना दिसला.त्यामुळे मंडळाने ईशानला फटकारून रणजी खेळण्याचे आदेश दिले.