Why No Ranji Trophy Mandate For Hardik Pandya | इशान किशनप्रमाणे हार्दिक पंड्याही रणजी ट्रॉफी खेळत नाही. पण बीसीसीआयचा दोन्ही खेळाडूंबाबतचा दृष्टिकोन वेगळा आहे. रणजी न खेळणाऱ्या हार्दिक पांड्यावर बीसीसीआय कठोर कारवाई का करत नाही? रणजी ट्रॉफी न खेळणाऱ्या (Ishan-Hardik Controversy) टीम इंडियाच्या खेळाडूंवर कारवाई करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतल्याने हा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र हार्दिक पांड्याबाबत बीसीसीआयची भूमिका मवाळ आहे. मात्र, बीसीसीआयनेही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. बीसीसीआयचे म्हणणे आहे की, हार्दिक पांड्याचा फिटनेस लक्षात घेऊन त्याला दिलासा देण्यात आला आहे.
टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “अनेक खेळाडू रणजी ट्रॉफीऐवजी आयपीएलला महत्त्व देत आहेत. त्यामुळे यापुढे या खेळाडूंना रणजी ट्रॉफीमध्ये तीन ते चार सामने खेळणे बंधनकारक असेल. हार्दिक पांड्याचे प्रकरण वेगळे आहे कारण त्याचे शरीर लाल-बॉल क्रिकेटची कठोरता स्वीकारू शकत नाही. तो कसोटी क्रिकेटचा भार सहन करू शकत नाही आणि टीम इंडियाला तो आयसीसी स्पर्धांसाठी तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.”
या संपूर्ण वादाची सुरुवात झाली किशनवरून…
या संपूर्ण वादाची सुरुवात इशान किशनवरून झाली आहे. टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी इशान किशनला रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्याची अट घालण्यात आली होती. पण किशनने या अटीकडे दुर्लक्ष केले आणि झारखंडच्या एकाही रणजी सामन्यात भाग घेतला नाही. यानंतर किशन आयपीएलसाठी गुजरातमध्ये सराव करत असल्याची माहितीही समोर आली.
किशनच्या या कृतीनंतर बीसीसीआयकडून कठोर निर्णय घेण्यात आले आहे. बीसीसीआयचे म्हणणे आहे की, जर खेळाडू टीम इंडियासाठी खेळत नसतील तर त्यांना देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे लागेल. बीसीसीआय लवकरच यासंदर्भातील नियमही आणू शकते. या नियमानुसार खेळाडूंना रणजी ट्रॉफीचे (Ranji Trophy) चार ते पाच सामने खेळणे बंधनकारक असू शकते.
BCCI | इशान-श्रेयसला मोठा झटका! बीसीसीआयनं फर्मान देत संघनिवडीबाबत घेतला ‘हा’ कठोर निर्णय…
दरम्यान, बीसीसीआयने अखेर आपले संकेत खरे ठरवताना इशान किशन व श्रेयस अय्यर यांना देशांतर्गत रणजी करंडक स्पर्धेत खेळण्याचे आदेश दिले आहेत. जर या दोघांनी हे आदेश मान्य केले नाहीत तर भारतीय संघ निवडीसाठी त्यांचा विर केला जाणार नाही, असे देखील स्पष्टपणे सांगितले आहे. दोनच दिवसांपूर्वी बीसीसीआय असा निर्णय घेइल याचे संकेत मिळाले होते.