नगर -निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था आणि श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने दैठणेगुंजाळ (ता.पारनेर) येथील शेतांच्या बांधावर वृक्षरोपण व बीजरोपण करण्यात आले.
यावेळी निसर्ग मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष नाना डोंगरे, शांताराम आबुज, सावळेराम येवले, अनिता येवले, प्रमोद येवले, प्रवीण येवले, युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे उपस्थित होते.
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ आणि डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने जिल्ह्यात बीजारोपण व वृक्षरोपणाचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत दैठणेगुंजाळ येथील शेतांच्या बांधावर वृक्षरोपण करुन बीजारोपण करण्यात आले.
पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण ही काळाची गरज बनली आहे. वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळला. यामुळे अनेक नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे.स्थानिक शेतकऱ्यांनी लावलेल्या झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्विकारली.