आळंदी – येथील श्री स्पोकन इंग्लिश इन्सिट्यूट परिसरात विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करीत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. यावेळी इन्स्टिट्यूटचे शिक्षक राजेश बर्दापुरे आणि विद्यार्थ्यांनी चिंच, वड, कडुलिंब, लिंब, गुलमोहर, जांभूळ, बदाम अशा विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली आणि लागवड केलेले सर्व वृक्ष जगविण्याचा मानस व्यक्त केला.
झाड हे आपल्या निसर्गाचा महत्त्वाचा घटक आहे. वृक्ष आपल्या निसर्गाची शोभा वाढवतात. पर्यावरणाला, निसर्गाला झाडांमुळे सौंदर्य प्राप्त होते. वृक्ष आपल्याला जीवनावश्यक सर्व गोष्टी देतात. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष महत्त्वाची कामगिरी बजावत असतात. परंतु अलीकडे पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत चालला आहे, अशा परिस्थितीमध्ये वृक्षारोपण करणे ही काळाची गरज बनली आहे, अशी भावना बर्दापुरे यांनी व्यक्त केली.