पिंपरी –
वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।
पक्षी ही सुस्वरें आळविती ॥
येणें सुखें रुचे एकांताचा वास ।
नाही गुण दोष अंगा येत॥
आकाश मंडप पृथुवी आसन ।
रमे तेथें मन क्रीडा करी ॥
अशा शब्दांमध्ये संत तुकाराम महाराजांनी निसर्गाची महती वर्णन केली आहे. हेच तुकाराम महाराज ज्या ऐतिहासिक रामझर्याचे पाणी पित असत, असा उल्लेख आढळतो, तोच रामझरा आज कुदळवाडीचा नाला म्हणून ओळखला जात आहे. नागरिकांना मनाई करणार्या महापालिका प्रशासनाने पर्यावरणप्रेमी व नागरिकांचा विरोध मोडीत काढत पूरनियंत्रण रेषेत हा नाला उभारून आपल्या कार्याची प्रचिती दिली आहे. नाल्यावर उभारलेला सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) हा राजकीय वरदहस्ताने माथी मारलेला खर्च असल्याची चिखलीत उघड चर्चा आहे.
कुदळवाडीतून वाहणार्या रामझर्याविषयी बहुतांश नागरिकांना फारशी माहिती नाही. मात्र. या झर्याचा संत तुकाराम महाराजांशी संंध जोडला जातो. भक्ती आराधनेदरम्यान संत तुकाराम महाराज या झर्याचे पाणी प्राशन करायचे. त्यामुळे हा रामझरा सर्वांसाठी पवित्र आहे. मात्र. हा झरा ासल्याचे आता दिसत नाही. दररोज हजारो लिटर्स सांडपाणी वाहून नेणारा नाला बनला आहे.
इंद्रायणीच्या प्रदूषणाबाबत असणारी ओरड कमी करण्याच्या दृष्टीने मोईफाट्यानजीक असलेला सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प नावालाच उभारल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे निरखून पाहिल्यानंतरच हा सांडपाणी प्रकल्प असल्याचे आपल्या लक्षात येते. हा एसटीपी उभारण्याच्या कामाविषयी माहिती घेतल्यास त्याचे राजकीय धागेदोरे लक्षात येतात. एकीकडे विधीमंडळात हा प्रश्न लक्षवेधीद्वारे मांडला गेला. तर दुसरीकडे महापालिका प्रशासनाकडे एसटीपीबाबत समाधानकारक खुलासा नसल्याचे वारंवार समोर आले आहे. केवळ राजकीय पुढार्यांपुढे मान तुकवायची की नदीपात्राच्या प्रदूषणासाठी प्रभावी पावले उचलावीत, याचा निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. केवळ शासनाचे अन्य विभाग, नदीमार्गातील अनेक स्थानिक स्वारज्य संस्थांकडून होणारे प्रदूषण याकडे बोट दाखवून चालणार नाही.