पिंपरी – रावेत येथील मेट्रो इको पार्कमधील झाडे वाचविण्यासाठी रावेत मेट्रो इको पार्क बचाव समिती आणि पर्यावरणप्रेमींच्या वतीने मंगळवारी (दि. २३) उपोषण करण्यात आले. या वेळी रावेत इको पार्क हे नागरिकांसाठी खुले करावे, जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी हे १४० झाडांच्या कत्तलीस कारणीभूत व जबाबदार असून ही झाडे मारण्याचे कृत्य जाणीवपूर्वक केल्याने वृक्ष कायदा, जैवविविधता कायदा व वन्यजीव कायद्याअंतर्गत कारवाही व्हावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
पार्कच्या प्रवेशद्वाराबाहेर या वेळी मोठ्या संख्येने पर्यावरणप्रेमी व रावेत मेट्रो इको पार्क बचाव समितीच्या सदस्यांनी उपोषण केले. पार्कमधील झाडे पाणी न मिळाल्याने १४० झाडे मृत झाल्याचा अहवाल महापालिकेच्या उद्यान विभागाने पर्यावरण प्रेमींच्या मागणीनुसार त्यांना दिला आहे. ही झाडे जगावित यासाठी पर्यावरणप्रेमी मंगळवारपासून रावेत मेट्रो इको पार्कच्या मुख्य द्वाराजवळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपोषण सुरु केले आहे.
या वेळी रावेत इको पार्क हे नागरिकांसाठी खुले करावे, सदर जागा निवडणूक आयोगाला हस्तांतरित करताना ही जागा मोकळी व पडीक असल्याचे का नमूद केले ? ही शासनाची फसवणूक नाही का ? असेल तर संबं.िधत अधिकाऱ्यावर कारवाइ होणार का ? असा प्रश्न विचारण्यात आले. जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी हे १४० झाडांच्या मृत्यूस जबाबदार आहेत. ही झाडे मारण्याचे कृत्य जाणीवपूर्वक केल्याने वृक्ष कायदा, जैवविविधता कायदा व वन्यजीव कायद्या अंतर्गत कारवाइ व्हावी.
निवडणूक अयोगासाठी हे सार्वजनिक बांधकाम विभाग हे अवैध बांधकाम करत आहे. त्या याबाबत पिंपरी चिंचवड महापालिका यांनी परवानगी नाकारली असतानाही काम सुरू आहे, त्यावर कारवाइ करावी, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.