मुंबई – भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या शिवसेना भवन फोडण्याच्या वक्तव्यावरुन सध्या महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं आहे. प्रसाद लाड म्हणाले होते की,’ नारायण राणे आणि राणे कुटुंबीयांना मानणारा देखील स्वाभिमानचा एक खूप मोठा गट आज राणे साहेबांच्या निमित्तानं, नितेशजींच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीमध्ये आलाय. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद निश्चितपणे डबल झाली आहे.’
ते पुढे म्हणाले की,”तुमची आमची ह्यांना एवढी भीती वाटते की आपण माहिमध्ये आलो तरी ह्यांना वाटतं की हे सेनाभवन फोडणार आहेत. काय घाबरू नका वेळ आली तर ते दे.’
सध्या त्यांनी केलेल्या या विधानावर शिवसेनेचे कार्यकर्ते, आमदार, खासदार, मंत्री त्यामुळे संतप्त झाले असून आपला संताप व्यक्त करत आहेत. यातच उदय सामंत यांनीही प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाले उदय सामंत
शिवसेना भवन फोडू म्हणणाऱ्या भाजपच्या काही पुढाऱ्यांच्या राजकीय विचारांच्या दिवाळखोरीच उत्तर महाराष्ट्रातील जनता नक्की निवडणुकीत ह्यांना भुईसपाट करून देईल… वंदनीय बाळासाहेबांचं शिवसेना भवन हे महाराष्ट्रासाठी भूषण आहे.. जय महाराष्ट्र..!
— Uday Samant (@samant_uday) July 31, 2021