मुंबई: राज्यातील जनता अतीवृष्टीमुळे आणि पूरपरिस्थितीमुळे बेहाल असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र प्रचारासाठी महाजनादेश यात्रेचा ताल धरलाय. अतिवृष्टीमुळे राज्याच्या विविध भागात आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आहे. पण मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून प्रचारदौरे करण्यात व्यस्त आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
शिवाय संपूर्ण यंत्रणा मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी आणि बंदोबस्तासाठी तैनात आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यापेक्षा प्रचार दौरे मुख्यमंत्र्यांना महत्त्वाचे वाटतात का? असा प्रश्न देखील राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला आहे.